बालसंगोपनाचे पाच घटक
गर्भधारणेपासून सुरूवातीच्या तीन वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची वाढ अगदी झपाट्याने होत असते. या काळात योग्य बालसंगोपनामुळे अल्पकाळ व दीर्घकाळ टिकणारे अनेक फायदे होतात. जसे की बालक हुशार होते, वागण्यातील हिंसकता कमी होते, बालक मोठे झाल्यावर चिंता आणि नैराश्याचे प्रमाण कमी होते, बालकाच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. बालकाच्या योग्य संगोपनासाठी पुढील पाच घटक अतिशय महत्वाचे असतात. हे सर्व घटक बालकाला मिळाल्यास बालकाचा सर्वांगीण विकास उत्तमरित्या होण्यास मदत होते.
